देशात सांप्रदायिक सद्भाव वृध्दिंगत झाल्यास आपोआप जात, धर्म, पंथ, पक्ष यातील विषमता दूर होऊन राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागते. असे मौलिक विचार राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने दिनांक 23 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. ईश्वर मोहुर्ले यांनी मांडले. रासेयोच्या विद्यार्थ्यांनी भजन व संप्रदायिक गीते सादर करून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविले. तुकडोजी महाराज यांची बंधुभावाची शिकवण, एकमेका साह्य करण्याचे औदार्य. गरिबांना मदतीचा हात देण्यातच ईश्वर आहे. या भावार्थाची भजने व गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रमुख अतिथी डॉ. के. जे. सीबी यांनीही आपल्या मनोगतातून समायोजित विचार व्यक्त केले बादल गणवीर, अजित ठलाल, शालिनी गेडाम, वैष्णवी नाकाडे यांनी गायलेल्या सुमधुर गीतांना यामिना नागोसे व इतर सहकाऱ्यांनी साजेसा कोरस दिला. तबलावादन बादल गणवीर यांनी तर अजित ठलाल यांनी हार्मोनियमवर साथ दिली. पराग नंदेश्वर यांनी ऑर्गनवर सोबत केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. मोतीलाल दवे यांनी तर सूत्रसंचालन , निवेदन व आभार लक्ष्मीकांत कापगते यांनी मानले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. मोतीलाल दर्वे, प्रा कैलास लोखंडे, प्रा राजेश डोंगरवार तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक राहुल भेंडारकर, गिरीश ठोंबरे, विशाल कोल्हे, लोकेश बोरकर, वैष्णवी बोरकर व तनुजा कापगते यांच्या गृप नं. 6 ने परिश्रम घेतले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, रासेयो स्वयंसेवक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.